Monday, February 4, 2019

ओळख प्रेमाची ( एक प्रेमकथा )


समर हा असा मुलगा आहे ज्याने कधीही प्रेमावर विश्वास नाही ठेवला.आणि याच गोष्टीवरुन त्याचे त्याच्या मित्रांशी नेहमी वाद व्हायचे.तो इतका कॉन्फीडंट होता की आपण या जगातल्या कोणत्याही मुलीचं हृदय परीवर्तन (शुद्ध भराठी भाषेत याला "पोरगी पटवणे"असं म्हणतात) करु शकतो,असं त्याला वाटायचं. या जगात प्रेम नावाची कसलीही गोष्ट नसुन फक्त वासनाच आहे असं त्याचं म्हणणं होतं.
एक दिवस त्याच्या मित्रांनी त्याच्याशी पैज लावली की जर तु योगिता आणि जय या प्रेमवीरांना वेगळं करुन दाखवलंस तर तुझी गोष्ट आम्ही सर्वार्थाने मान्य करु.त्याने पैज स्वीकारली. समर हा खरातर खुपच हुशार मुलगा आहे.मुली पटवण्याची त्याची आपली एक वेगळीच स्टाईल आहे.आणि खरंच त्या स्टाईलवर एक दिवस योगिता घसरली.ओळख
झाली,चांगली मैत्री ही झाली.पण एक दिवस खरंच जेव्हा ठरल्याप्रमाणे प्रेमातील नाटकाचा एक भाग म्हणुन समरने तिला I LOVE YOU म्हटलं.तेव्हा त्याचं उत्तर देण्याआधी तिने जयबरोबर केलेल्या breakup बद्दल सगळं सांगितलं.
त्याने त्यावर काहीही आक्षेप घेतला नाही.मग त्याने तिला त्याच्या या कारणासहीत तिला स्वीकारण्याचं नाटक केलं.आणि एका कच्च्या पायावर
उभ्या असलेल्या रिलेशनशिपमध्ये ते राहु लागले. एकमेकांसोबत ते वेळ घालवु लागले.आणि याचीच जाणीव त्याने मित्रांना करुन दिली.
मित्रांनाही त्याची बाजु मान्य करावीच लागली.त्यानंतर त्याने अधिकृतरित्या तिच्याशी breakup केला.ती खुपच दुःखावली गेली कारण breakup चं योग्य कारणच तिला कळलं नव्हतं.पण समरला ही परिस्थिती काही नवीन नव्हती. त्याने असे कित्येक breakups याआधीही केले होते.पण आता येणारी परिस्थिती त्याच्यासाठी नवीन होती.
तिला तिचा गोड आवाज सारखासारखा आठवु लागला.तिचा चेहरा समोर
दिसायचा.वार्याची झुळुक तिचा सुगंध घेऊन यायची.पाण्याच्या स्पर्शात
त्याला तिची जाणीव व्हायची.पुन्हाप ुन्हा आरशासमोर जाऊन उभं राहायचा.काय होतंय हे कळतंच नव्हतं.
आणि एक दिवस स्वप्नात योगिता आली.खुपच दुःखी होती ती.breakup
मुळे ती आत्महत्या करायला चालली होती.ती दहा मजली ईमारतीवरुन
उडी मारुन जीव देणार तेवढ्यात त्याला जाग आली.समोर त्याची धाकटी बहीण दिशा त्याच्यासाठी bed tea घेऊन आली होती.
ती म्हणाली,.gd moning दादा.हा घे चहा। त्याने चहा घेतला. योगिताबरोबर तु असं करायला नको होतंस दादा। तुला कसं कळलं योगिताबद्दल?तु पुन्हा माझी डायरी पुन्हा वाचलीस.थांब तुला मी आता बघतोच....
दिशाःsorry sorry मी पुन्हा नाही असं करणार. समरःok.(थोडा विचार करुन)खरंच मी चुकलो का गं? दिशाःहोय खुपच..जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलावर प्रेम करते तेव्हा ती त्यालाच सर्वस्व मानते.आणि तु
तर तिचा विश्वास तोडुन तिचं सर्वस्वच हिरावुन घेतलंस.तुला एक सांगते जय नावाचा जो मुलगा आहे ना त्याने स्वतःच्या गळ्याला चाकु लावुन योगिताचा होकार मिळवला होता.म्हणुन ते नातं एक ना एक दिवस तुटणारच होतं फक्त याला कारणीभुत तु ठरलास ....
समरःखरंच.आणि मीही खुपच चुकीचं वागलो.मी खुपच practically वागायचो.मला माहीती नव्हतं की प्रेम ही practically नाही heartly करण्याची गोष्ट आहे.तुला मी एक खरं सांगु का मी खरंच योगिताच्या प्रेमात पडलोय गं.
दिशाःअरे मग जाउन सांग ना तिला. समरःपण ती मला माफ करेल? दिशाः तिचं तुझ्यावर खरं प्रेम आहे ना?मग नक्की माफ करेल दिशाचं ऐकुन त्याने योगिताची शोधाशोध सुरु केली.ती तिच्या आजीकडे गेलीय,हे
समरला कळलं.तिच्या प्रेमाची एक परीक्षा म्हणुन तो एका नवीन रुपात तिच्यासमोर प्रेझेँट झाला पण थोडाही वेळ न लावता तिने त्याला ओळखलं.त्याला पाहुन तिला प्रचंड आनंद झाला.त्याने तिची मनापासुन
माफी मागितली.आणि आपल्या मनातलं खरं प्रेम त्याने व्यक्त केलं.
योगितानेही वेळ न दवडता त्याला मोठ्या मनाने माफ केलं.आणि तिने समरला आहे तसं स्वीकारलं.
मित्रांनो ही होती समरची प्रेमकथा,पण प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट असा गोड होईलच असा नाही.हा पण जरा समझदारीने निर्णय घेतला तर जवळजवळ प्रत्येक lovestory चा शेवट हा गोडच होईल.

No comments:

Post a Comment