Welcome To RK Creation स्वागत आहे
आपले सहर्ष स्वागत आहे.या ब्लॉग मध्ये तुम्हाला भटकंती,कथा,कविता, निबंध,वाचायला मिळतील.
Sunday, October 31, 2021
चाळीतली दिवाळी🪔🎉*
Sunday, February 17, 2019
मैत्री
प्रतीक शी बोलयला तिला खूप आवडायच ! Whatsapp वर msg , कॉल रोज अगदी न चुकता ! तो ही तिला कधीकधी ए रडकी , ए खडूस काही ही म्हणायचां . तिला ही आवडायचं त्याने तस म्हटलेलं ! तिचा स्वभाव च तसा होता , खूप हळवा आणि संवेदनशील ! आनंद झाला तरी डोळे भरून यायचे , कोणी तिच्या कडून दुखावलं तरी डोळे भरून यायचे !
पण तितकीच कणखर ही होती . स्वतःवर , स्वतःच्या निर्णयावर तिचा विश्वास होता ! बोलण्यात एक धार होती , चाणाक्ष नजर होती ! स्पष्टवक्तेपणा हा तिचा गुण म्हणावा की दुर्गुण ? पण त्या मुळे कधी कोणी दुखावलं जायचं तर कधी त्याच कौतुक होऊन तीच वागणं बरोबर आहे अशी पावती मिळायची !
त्याला हाच तिचा गुण जास्त आवडायचा ! जे काय असेल ते स्पष्ट आणि मनमोकळं बोलणं! राग आला तर राग ही व्यक्त करायची . त्याच्याबद्दल काही वाटलं तर ती भावना ही मोठ्या मनाने व्यक्त करायची ! कधी वाद घालून , भांडून ही ती तीच म्हणणं मांडायची आणि त्याला पटवायची ! पण बोलताना त्याने किंवा तिने गैरशब्दाचा वापर कधीही केला नाही . अस वागून प्रत्येकवेळी ती त्याच्या वरचा हक्क च दाखवायची. हेच तीच वागण त्याला आवडायचं आणि म्हणूनच तो ही तिच्या जवळ येत गेला !
त्या दोघांमध्ये ओढ होती कुठली अस नव्हतच !दोघे ही matured होते , समंजस होते , स्वतःच बरवाईट कळणारे होते ! तिचा स्वभाव थोडा हट्टी आणि जिद्दी होता आणि त्याचा शांत , संयमी ! विरुद्ध स्वभाव पण तरीही दोघांचं छान जमायचं .एकमेकांशिवाय , एकमेकांना बोलल्या शिवाय करमायच नाही !
ते दोघे एकमेकांत गुंतले होते ही आणि नव्हते ही ! आपापली space जपुनच त्यांचं वागणं होत !
पण तिथे त्यांच्यात प्रेम हा विषय कधीच नव्हता आणि तस बोलणं ही नसायचं !
प्रतीक च्या आयुष्यात अश्यातच अजून एक मुलगी आली " तन्वी" ! त्याच्या च ऑफिस मध्ये नवीनच जॉईन झाली होती . दिसायला नेहा पेक्षा उजवी नव्हतीच पण हुशार होती नेहा पेक्षा स्मार्ट होती ! तीच बोलणं , वागणं प्रतीक ला तिच्या कडे आकृष्ट करत होत .तिच्या बद्दलच्या त्याच्या भावना नेहा पेक्षा खूप वेगळ्या होत्या हे त्याला जाणवायला लागलं होत . कारण तो आजकाल नेहा पेक्षा तन्वी ला जास्त वेळ देत होता ! त्यालाही मनातून हे जाणवायचं की आपण आजकाल नेहाशी पहिल्या सारख बोलत नाही , कॉल नाही , msg करत नाही ! आणि तीही बिचारी काही न बोलता समजून घेते ! पण हे किती दिवस चालणार ? त्याला स्वतःलाच वाटलं , आपण नेहा पासून लांब जातोय , तिला टाळतोय ! तन्वी मध्ये जास्त गुरफटलो आहोत !
प्रतीक ची अवस्था इकडे आड तिकडे विहीर झाली होती ! त्याला एक मैत्रीण म्हणून नेहा हवी होती आणि प्रेयसी म्हणून तन्वी ! काय करावं नेहाशी कस बोलू काय सांगू तिला ? तिला तन्वी बद्दल सांगू का ? तिला काय वाटेल ? तिने आपल्या बद्दल काय विचार केला असेल? ह्या आणि अश्या बरयाच प्रश्नांनी प्रतीक ला सैरभैर केलं होतं ! पण निर्णय घ्यायचा होता आणि तो नेहाला लवकर सांगण गरजेचं होतं !
नेहाला ही आजकाल प्रतीकच्या वागण्यातला बदल जाणवत होता ! पण तो स्वताःउन काही सांगत नव्हता म्हणून तिला ही वाटलं कुठल्या कामात bussy असेल म्हणून जास्त बोलत नसेल ! पण तिला त्याची इतकी सवय झाली होती की त्याला कुठलं काही सांगितलं नाही तर तिला चैन पडायची नाही आणि आजकाल तर त्याच बोलणं , कॉल , msg सगळं च कमी झालं होतं !
नेहा ला ही जाणवलं होत आपण प्रतीक मध्ये गुंतलो आहोत . हेच का प्रेम ? ह्यालाच म्हणतात का प्रेम ? स्वतःलाच तिने विचारल आणि लाजली !
आज ती आरश्या समोर उभी राहून हेच ठरवत होती . प्रतीक ला आज आपण propose डे च निमित्त साधून propose करू ! मनातल्या मनात ति आपल्याच ह्या घेतलेल्या निर्णयावर खूप आनंदली आणि सुखावली होती !
आज प्रतीक ने ही ठरवलं होतं त्याच्या मनातलं नेहाला सांगावं . त्यासाठी तिला कॉल करून आज तो तिला भेटायला बोलावणार होता ! विचार करत च होता की तिकडून नेहाचा कॉल आला ! काय रे किती दिवस झाले तुझा कॉल नाही , कधी तरी gm , gn चा msg करतोस ! आजकाल आठवण येत नाही वाटत मैत्रिणीची ! कोणी दुसरी भेटली की काय अस मुद्दाम बोलून त्याला बोलत करत होती !
प्रतीक क्षणभर गोंधळला , त्याला वाटलं खरंच नेहाला काही कळलं तर नसेल न माझ्या आणि तन्वी बद्दल ? पण माझ्या शिवाय तिला सांगणार कोण ? स्वतःशीच पुटपुटला ! तिकडून नेहा विचारत होती , अरे मी काय विचारते प्रतीक ? कुठे लक्ष आहे तुझं ?
नाही ग अस काही नाही , ऑफिस मधून msg आला होता तो चेक करत होतो अस म्हणून वेळ मारून नेली त्याने ! नेहा मला तुला काही संगायच आहे !आपण आज भेटायचं का ? अरे वा प्रतीक मी पण हेच म्हणार होते ! बघ आपले विचार किती जुळतात न ,अस म्हणून हसली आणि त्याला विचरलं बोल कुठे भेटायचं सांग ?
आपल्या नेहमीच्या च ठिकाणी भेटू ग! छान डिनर घेऊ , चालेल न तुला नेहा . हो रे चालेल त्यात काय , ह्या आधी ही आपण बरेच वेळा गेलोय की ! तर चल मग मी 7 वाजता त्या रोजच्या table च आपलं बुकिंग करून ठेवते ! नको नको आज तू नको मी करतो , आज माझ्या कडून पार्टी ! ओके प्रतीक भेटू मग , चल बाय !
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या .बरेच दिवस न भेटल्या मूळे नेहाचा राग साहजिक होता ! पण आज प्रतीक कडे त्याला उत्तर नव्हतं ! तो शांत च होता !
काय झालं प्रतीक ? आज बोलत का नाहीस ? त्याला काय आणि कसं सांगावं कळत नव्हतं !
काही नाही ग नेहा ,कामाचा व्याप वाढलाय आणि त्याच टेन्शन आहे ! कशी तरी वेळ मारून नेली प्रतीक ने .पण हे सांगताना त्याने नेहा कडे अजिबात बघितलं नाही ! त्याची हिम्मतच होत नव्हती तिच्या कडे बघून बोलयची !
प्रतीक मला तुला काहि तरी सांगायचंय !
बोल न नेहा , मला ही तुला सांगायचंय , पण आधी तू सांग !
अगदी पहिल्यांदा त्याच्याशी बोलत असल्या सारख त्याची नजर चुकवत थोडं लाजत नेहाने तिच्या मनातलं सगळं सांगितलं ! प्रतीक ऐकतोस न !अस तिने म्हटल्यावर तो भानावर आला ! त्याला काय बोलावं सुचेना . आपलं आणि तन्वीच हिला सांगितलं तर ही कशी react होईल याची त्याला भीती वाटत होती ! मनाशीच पुटपुटला , किती उशीर केलास नेहा , लवकर का नाही सांगितलंस ?
नेहा ने ओळखलं ह्याच्या मनात नक्कीच दुसरी कोणी तरी असणार ! म्हणूनच ह्याला आता आपल्याला कस सांगावं अस वाटत असेल ?
काही बोललास का प्रतीक ?
काही नाही ग कुठं काय !
नेहा खुर्चीवरून उठली आणि त्याच्या जवळ गेली . हळूच त्याच्या केसातून हात फिरवला आणि विचारलं कोण आहे ती प्रतीक ?
हे वाक्य ऐकून प्रतीक चे डोळे भरून आले .नेहा कस ओळ्खलस तू ? अरे वेड्या मी तुला 4 वर्ष झाले ओळखते ! तुझ्या मनात काय आहे ? तू का शांत आहेस? हे मी तुझ्या नुसत्या msg मधून ही बरेच वेळा मी ओळखलं आहे , तू सांगितलं नाहीस तरी ते जाणवायचं मला . तुही म्हणायचास कस काय ओळ्खतेस ग तू नुसत्या माझ्या msg मधून ? पण प्रत्येक वाक्यातून तुझ्या मनातल माझ्या पर्यंत पोचायचं !
पण वेड्या आज माझ्याकडे पर्याय नव्हता . तुझ्या कडून हे काढून घेण्याशिवाय .म्हणून आज तुला इथे बोलावून विचारावं वाटलं आणि माझी शँका खरी निघाली ! अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस , मला अजिबात राग आलेला नाही किंवा वाईट ही वाटलेलं नाही .उलट आनंद च झाला तू कोणाच्या तरी प्रेमात पडलास!
चेहऱ्यावर खोटं हसू आणि पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला म्हणाली अरे वेड्या , मला वाटलं माझ्या सारख्या जिद्दी आणि हट्टी मुलीच्या प्रेमात पडतोस की काय ?
अस म्हटल्यावर प्रतीक ला ही संकोचल्या सारख वाटलं ही मुद्दाम तर अस म्हणत नसेल न अशी शंका आली त्याला ही ! काही काय ग नेहा , तू खूप छान आहेस! कोणी ही तुझ्याही प्रेमात पडेल ! अस म्हणून प्रतीक थोडं वर वर हसला , पण तेच वाक्य पकडत नेहा त्याला म्हणाली , मग तूच का नाही पडलास प्रतीक ? अस म्हणून जोरात हसायला लागली ! पण ते हसणं नसून आतून रडणं होत ! प्रतीक ला ते जाणवलं पण तो काहि बोलला नाही !
नेहा डोळे पुसत जागे वर येऊन बसली आणि म्हणाली , प्रतीक आत्ता मी जे तुला माझ्या मनातले ,तुझ्या विषयी जे सांगितलं ते खोटं होत रे ! मला तुझ्या मनातलं काढून घ्यायचं होत म्हणून तस सांगावं लागलं ! हे सांगताना नेहाचा आवाज खूप गदगदला होता , प्रतीक ला ही ते जाणवलं पण तो काही बोलला नाही ! नेहाला ही वाटलं होतं एकदा शेवट च प्रतीक ने तिला जवळ घ्यावं आणि सॉरी म्हणावं !
दोघानी कसे तरी थोडं थोडं खाऊन घेतलं आणि उठले .चल रे प्रतीक , मी निघते अस म्हणून नेहाने बाजूच्या खुर्ची वरची पर्स उचलली आणि चालायला लागली !
अग थांब न , नेहा चल मी तुला सोडतो घरी ! बराच उशीर झालाय !
नको प्रतीक जाईन मी ! आता सवय करावी लागेल मला एकटीला जायची ! इतकच कसबस बोलली आणि
त्याच्या कडे न पाहताच डोळे पुसत त्याला बाय केला.
थोडं पुढे गेली पण तिलाच राहवलं नाही परत मागे फिरली आणि प्रतीक sss म्हणून त्याच्या गळ्यात पडून रडली ! प्रतिक फक्त निश्चल उभा होता.......
तो ही मनातल्या मनात तिला सॉरी म्हणत होता ......
आरती 🖋....
Monday, February 4, 2019
ओढणी
ओळख प्रेमाची ( एक प्रेमकथा )
समर हा असा मुलगा आहे ज्याने कधीही प्रेमावर विश्वास नाही ठेवला.आणि याच गोष्टीवरुन त्याचे त्याच्या मित्रांशी नेहमी वाद व्हायचे.तो इतका कॉन्फीडंट होता की आपण या जगातल्या कोणत्याही मुलीचं हृदय परीवर्तन (शुद्ध भराठी भाषेत याला "पोरगी पटवणे"असं म्हणतात) करु शकतो,असं त्याला वाटायचं. या जगात प्रेम नावाची कसलीही गोष्ट नसुन फक्त वासनाच आहे असं त्याचं म्हणणं होतं.
एक दिवस त्याच्या मित्रांनी त्याच्याशी पैज लावली की जर तु योगिता आणि जय या प्रेमवीरांना वेगळं करुन दाखवलंस तर तुझी गोष्ट आम्ही सर्वार्थाने मान्य करु.त्याने पैज स्वीकारली. समर हा खरातर खुपच हुशार मुलगा आहे.मुली पटवण्याची त्याची आपली एक वेगळीच स्टाईल आहे.आणि खरंच त्या स्टाईलवर एक दिवस योगिता घसरली.ओळख
झाली,चांगली मैत्री ही झाली.पण एक दिवस खरंच जेव्हा ठरल्याप्रमाणे प्रेमातील नाटकाचा एक भाग म्हणुन समरने तिला I LOVE YOU म्हटलं.तेव्हा त्याचं उत्तर देण्याआधी तिने जयबरोबर केलेल्या breakup बद्दल सगळं सांगितलं.
त्याने त्यावर काहीही आक्षेप घेतला नाही.मग त्याने तिला त्याच्या या कारणासहीत तिला स्वीकारण्याचं नाटक केलं.आणि एका कच्च्या पायावर
उभ्या असलेल्या रिलेशनशिपमध्ये ते राहु लागले. एकमेकांसोबत ते वेळ घालवु लागले.आणि याचीच जाणीव त्याने मित्रांना करुन दिली.
मित्रांनाही त्याची बाजु मान्य करावीच लागली.त्यानंतर त्याने अधिकृतरित्या तिच्याशी breakup केला.ती खुपच दुःखावली गेली कारण breakup चं योग्य कारणच तिला कळलं नव्हतं.पण समरला ही परिस्थिती काही नवीन नव्हती. त्याने असे कित्येक breakups याआधीही केले होते.पण आता येणारी परिस्थिती त्याच्यासाठी नवीन होती.
तिला तिचा गोड आवाज सारखासारखा आठवु लागला.तिचा चेहरा समोर
दिसायचा.वार्याची झुळुक तिचा सुगंध घेऊन यायची.पाण्याच्या स्पर्शात
त्याला तिची जाणीव व्हायची.पुन्हाप ुन्हा आरशासमोर जाऊन उभं राहायचा.काय होतंय हे कळतंच नव्हतं.
आणि एक दिवस स्वप्नात योगिता आली.खुपच दुःखी होती ती.breakup
मुळे ती आत्महत्या करायला चालली होती.ती दहा मजली ईमारतीवरुन
उडी मारुन जीव देणार तेवढ्यात त्याला जाग आली.समोर त्याची धाकटी बहीण दिशा त्याच्यासाठी bed tea घेऊन आली होती.
ती म्हणाली,.gd moning दादा.हा घे चहा। त्याने चहा घेतला. योगिताबरोबर तु असं करायला नको होतंस दादा। तुला कसं कळलं योगिताबद्दल?तु पुन्हा माझी डायरी पुन्हा वाचलीस.थांब तुला मी आता बघतोच....
दिशाःsorry sorry मी पुन्हा नाही असं करणार. समरःok.(थोडा विचार करुन)खरंच मी चुकलो का गं? दिशाःहोय खुपच..जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलावर प्रेम करते तेव्हा ती त्यालाच सर्वस्व मानते.आणि तु
तर तिचा विश्वास तोडुन तिचं सर्वस्वच हिरावुन घेतलंस.तुला एक सांगते जय नावाचा जो मुलगा आहे ना त्याने स्वतःच्या गळ्याला चाकु लावुन योगिताचा होकार मिळवला होता.म्हणुन ते नातं एक ना एक दिवस तुटणारच होतं फक्त याला कारणीभुत तु ठरलास ....
समरःखरंच.आणि मीही खुपच चुकीचं वागलो.मी खुपच practically वागायचो.मला माहीती नव्हतं की प्रेम ही practically नाही heartly करण्याची गोष्ट आहे.तुला मी एक खरं सांगु का मी खरंच योगिताच्या प्रेमात पडलोय गं.
दिशाःअरे मग जाउन सांग ना तिला. समरःपण ती मला माफ करेल? दिशाः तिचं तुझ्यावर खरं प्रेम आहे ना?मग नक्की माफ करेल दिशाचं ऐकुन त्याने योगिताची शोधाशोध सुरु केली.ती तिच्या आजीकडे गेलीय,हे
समरला कळलं.तिच्या प्रेमाची एक परीक्षा म्हणुन तो एका नवीन रुपात तिच्यासमोर प्रेझेँट झाला पण थोडाही वेळ न लावता तिने त्याला ओळखलं.त्याला पाहुन तिला प्रचंड आनंद झाला.त्याने तिची मनापासुन
माफी मागितली.आणि आपल्या मनातलं खरं प्रेम त्याने व्यक्त केलं.
योगितानेही वेळ न दवडता त्याला मोठ्या मनाने माफ केलं.आणि तिने समरला आहे तसं स्वीकारलं.
मित्रांनो ही होती समरची प्रेमकथा,पण प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट असा गोड होईलच असा नाही.हा पण जरा समझदारीने निर्णय घेतला तर जवळजवळ प्रत्येक lovestory चा शेवट हा गोडच होईल.
खेडेगावातला तो तर शहरातली ती...
फ्रेंड लिस्ट मध्ये बरेच असतात ऑनलाईन, पण कोणाशीच बोलायची इच्छा नसते, बर्याच नवनवीन पोस्ट असतात पण नाही वाटत त्या वाचाव्या, कमेंट करावी.. होत अस कधी कधी ... कारण, वाटत असत ... फक्त आणि फक्त तिने किंवा त्याने रिप्लाय द्यावा. त्या एकाच व्यक्तीशी बोलायचं असत. खूप काही सांगायचं असत आणि बरच काही ऐकायचं असत. नेहमीच एका सारख्याच (विशिष्ट) वेळेला तीच ऑन लाईन येण हे माहित झालेलं असत त्याला, मग धडपड करून त्याच त्या वेळेला हजर होण आणि मग गप्पांच रंगत जाण... पाहिलेलं नसत दोघांनीही एकमेकांना पण तरीही विचारांचं जुळण जमलेलं असत. साधेसेच दररोजच्या आयुष्यातले तर विषय असायचे, कशाचाच कशाला ताळमेळ नाही.. त्याच शेतातल वार्यावर डोलणाऱ्या पिकाच केलेलं वर्णन तिला आवडायचं तर तीच गर्दीत एकमेकांना ढकलत ट्रेनला "क्याच" करण त्याला कौतुकास्पद वाटायचं. खेडेगावातला तो तर शहरातली ती.. तो डोंगराचे, नदीचे, पाटातल्या पाण्याचे फोटो तिला पाठवायचा तर ती रस्त्यावरच्या ट्राफिकचे, उंच इमारतींचे, फेसाळणार्या समुद्राचे फोटो त्याला पाठवायची. तो तिच्या नजरेतून शहर पाहायचा तर ती त्याच्या नजरेतून गाव अनुभवायची.मस्त गट्टी जमलेली त्यांची. "आज धो धो पाऊस कोसळतोय इथे.. मी जातोय भिजायला... सॉरी... आज गप्पांना सुट्टी " हा त्याचा मेसेज आला कि ती लॉग ओउट करायची तर " आज भन्नाट काम आहे... तुझ्याशी बोलत राहिले तर नाईट शिफ्ट करावी लागेल.. बोलू नंतर " हा तिचा मेसेज वाचला कि तो ऑफ लाईन व्हायचा. ना कधी राग न कधी कडवटपणा. काहीही असो.. दोघ समजून घ्यायचे एकमेकांना.पण आयुष्य म्हटल्यावर ते सरळ मार्गी नसणारच; नागमोडी, धोक्याची वळण नसतील तर ते आयुष्य कसलं. त्या दोघांचेही प्रश्न होतेच आणि तेही गाव आणि शहरातल्या समस्यानसारखेच.. एकदम वेगळे. खरतर भिन्न टोकांचे. तिने ज्यांचा कधी विचारच केला नव्हता तर त्याने हाही प्रश्न होऊ शकतो ? अशी काहीतरी भावना दर्शवलेली. तो पाणी नाही म्हणून पाण्याच्या ATM मधून, दूरवर जाऊन पाणी आणायचा अन वैतागायचा तर ती ब्यान्केच ATM नीट काम करत नाही म्हणून ब्यांकेत जाऊन गोंधळ घालून यायची. २४ तास घरात पाणी असणार्या तिला पाण्याच ATM माहित नव्हत तर काही किलोमीटर दूर असणार्या ब्यांकेत जाऊन धुमाकुळ घालता येतो हे त्याला पटतच नव्हत. घरात, शेजारी, मित्र मैत्रीण यांसोबत दोघांच बर्याचदा बिनसायच मग त्याचा परिणाम त्यांच्या बोलण्यावर व्हायचा पण भांडण नाही.. फक्त एकमेकांना समजावण, कधी कधी चर्चा करण.. कधी मत जुळायची कधी मतभेद व्हायचे. पणअबोला यायचं कारण नव्हतच कधी. त्या दोघांनीही बाजू एकदम सुरळीत सावरली होती. कधी स्वतःची तर कधीसमोरच्याची.कधी काळी एकमेकांना अनोळखी असलेले ते दोघ, आता स्वतःपेक्षा जास्त ओळखायला लागलेले असतात एकमेकांना. महिने जातात. त्यांचं अनोळखी नात घनिष्ठ होत जात. मैत्रीच्या थोड पलीकडे आणि प्रेमाच्या थोडस अलीकडे .. मग एक दिवस ती सांगते, "माझ लग्न ठरतंय.पहिलच स्थळ.एकदम जुळल…अचानकच” तो थोडावेळ शांत; मग उत्तरतो , "अभिनंदन, नवर्याला जास्त सतवू नकोस.." ती गप्पबसते.. तो हि काही बोलत नाही.. काही दिवस जातात मग आठवडे. संवाद थांबतो. अडखडत बोलण वाढत. एकमेकांशी बोलण्याची लागलेली सवय कि व्यसन तेही कमी होत जात. भावनांचा वाढलेला गोंधळ लक्षात आलेला असतो दोघांच्या पण त्यावर पर्याय नसतो किंवा जो होता तो मान्य नसतो. ती हि आता भावी नवर्याबरोबर स्वप्न रंगवण्यात गुंतलेली असते. तो हि कामात स्वतःला गुरफटवून घेतो. महिने जातात.मग एक दिवस ती त्याला लग्नाच्या पत्रिकेचा फोटो पाठवते पण सोबत एक मेसेज देखील.. "पाहिलं प्रेमविसरता येत नाही म्हणतात, तुलाही नाही विसरू शकणार मी..." नकळत मनातल, अस्पष्टपणे सांगितलं जात. त्याचाही दोन दिवसांनी रिप्लाय येतो.."मी आर्मी जॉईन करतोय . तुझ्यावरच प्रेम व्यक्त नाहीकरू शकलो पण मातृभूमिवरच प्रेम सिद्ध करतोय. तुही नेहमीच असशील माझ्या आठवणीत. तूच पहिलं आणि तूच शेवटच प्रेम. काळजी घे. आनंदात राहा. मी नसेन तरीही असेन आठवतंय आपल आवडत वाक्य... "हसतानाबरेच जण येतात सोबत द्यायला...पण रडताना कोणाची सोबत असेल तर बात बन जाये ... " फक्त आठवणी पुरेशा आहेत ग... अलविदा"ती बोहल्यावर चढली नि तो आर्मीत ड्युटीवर रुजू झाला. तिने लग्नाचा शालू नेसला आणि त्याने वर्दी चढवली. तिचा संसार सुरु झाला अन त्याची लढाई. शहीद झाला तेव्हा मुखात वन्दे मातरम सोबत तीच नाव होत. तिनेही वर्तमानपत्रात त्याची बातमी वाचली. रडत राहिली बराच वेळ.. पण आजही जेव्हा तिला खूप खूप रडायचं असत तेव्हा ती त्याच्याशीच बोलते... रात्रीच्या चांदण्यात त्याला शोधत हितगुज साधते.आजही “तो” तिच्यासोबत आहे आणि राहील...